खाजगीकरण, उदारीकरण, आणि जागतिकीकरण या खाऊजा च्या परिणामाने जगाबरोबरच भारतातही खूप उलथापालथ झालेली दिसून येते. पारंपरिक स्वरुपाची कुटुंब आणि गावपद्धती एकदम कालबाह्य ठरली. खरेदी विक्रीच्या ऑनलाइन पद्धती या आमच्या जगण्याचा आविभाज्य भाग झाल्या आहेत खाण्यापिण्याचे, मनोरंजन आणि अन्य स्वरूपाचे सारे रीतीरीवाजही बदलले. तंत्रज्ञान वेगानं आलं. डेस्कटॉपकडे नवलाईनं पाहणारी माणसं बघता बघता इंटरनेट, मोबाईल वापरू लागली. गुगल, युट्यूब आणि एकूणच इंटरनेट हे माहितीची आणि ज्ञानाची नवी माध्यमे आपल्या हातात आली. सीसीटीव्ही, मोबाईल कॅमेरा आणि या स्वरूपाच्या अन्य साधनांनी कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. यातून संपत जाणारी ‘प्रायव्हसी’ खरेच या अर्थाने आता आपण ग्लोबल व्हिलेजचे गावकरी झालो आहोत. जगायच्या नव्या पद्धती अंगी बानवून शहराप्रमाणे निमशहरी भागातही या सगळ्या बदलाचे पडसाद उमटलेले दिसतात. काळाच्या स्थित्यंतराचे बिनचूक आकलन असलेले व समकालीन काळाचे सहप्रवासी बालाजी सुतार कवी-लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी नियतकालिकांतून मोजक्या परंतु अभिजात अशा कथा लिहून कथाकार म्हणून आपली ओळख प्रस्थापित केलेली आहे. त्यांच्...