सोशल मिडीया वाचक व अभिरुची (लेख)
मागल्या पिढीपेक्षा आताच्या पिढीचे वाचन अगदी अल्प झाले आहे अशी तक्रार सर्वच ठिकाणी ऐकावयास मिळते. माणसाचे मन सुविचार संपन्न होण्यासाठी वाचनाची आवड निर्माण होणे आवश्यक आहे. वाचनाने माणूस मोठा होत असतो. पुस्तकांचे वाचन केल्याने ज्ञान वाढत जाईल. ग्रंथ हे गुरू आहेत. हे लक्षात घेतले तरच वाचन संस्कृती वाढावयास मदत होईल. टीव्हीचा वाढता प्रभाव, सोशल मीडिया साइट्स, इंटरनेट, या माध्यमामुळे तरुणाईबद्दल वाचनाविषयी फारच काळजीचे वातावरण आहे. आता तर इंटरनेटचा वापर मोबाइलसारख्या सोप्या माध्यमाद्वारे करू लागले आहेत. इंटेरनेटच्या पाठीवरून आलेल्या व त्यांनी दिलेल्या व्यक्त व्हायची संधीतून सोशल नेटवर्किंग वाढत गेले. जगाच्या कानाकोपऱ्यातील मंडळी एकमेकांशी संवाद साधू लागली. वेगवेगळ्या आवडी, छंद आणि इतर औत्सुकतेच्या विषयांनुरूप हे ग्रुप,गट वाढत जात आहेत. तंत्रज्ञानाची क्रांती एकविसाव्या शतकात जन्मलेल्या जवळपास प्रत्येकाला मोबाइल तंत्रज्ञानासोबत इंटरनेट उपलब्ध असणे ही फारच क्रांतिकारक सोय निर्माण झाली आहे. प्रत्येक मोबाइलधारक हा शब्दशः महाभारतातील संजयाइतका पारंगत होत आहे. “इंटरनेट आणि ‘ई-बुक’ यांनी आज वाचनालय...

Comments
Post a Comment